मुलांमध्ये वाढत जाणारा चिडचिडेपणा आणि मोबाईलचा प्रभाव
आजच्या डिजिटल युगात मोबाइल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. शिक्षण, करमणूक, संपर्क आणि माहिती यासाठी मोबाइल अत्यंत उपयुक्त ठरला आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर विशेषतः लहान मुलांमध्ये काही गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या निर्माण करत आहे. त्यात प्रमुख म्हणजे चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा आणि एकाग्रतेचा अभाव.
मोबाइलचा लहान मुलांवर होणारा परिणाम
- सतत स्क्रीनकडे लक्ष :- लहान वयात मुलं जेव्हा मोबाईलवर वेळ घालवतात, तेव्हा त्यांच्या मेंदूवर त्याचा सरळ परिणाम होतो. सतत व्हिडिओ बघणं, गेम खेळणं, रील्स पाहणं – यामुळे मुलांचं लक्ष कुठेही स्थिर राहत नाही.
- वास्तविक संवाद कमी होतो :- मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांचा पालक, शिक्षक किंवा इतर मुलांशी संवाद कमी होतो. त्यामुळे सामाजिक कौशल्यांचा अभाव होतो.
- चिडचिडेपणा व सहनशक्तीचा अभाव :- मोबाईलवर सतत बदलणारी दृश्यं, वेगवान माहिती, आणि त्वरित प्रतिसादाची सवय मुलांना शांत बसणं किंवा काही वेळ वाट पाहणं अशक्य करते. त्यामुळे ते पटकन चिडतात, रडतात किंवा रागावतात.
- शारीरिक हालचाल कमी होते :- खेळणे, धावणे, मैदानी उपक्रम – हे सर्व कमी होत असल्यामुळे शरीराची वाढ आणि आरोग्य दोन्हीवर परिणाम होतो.
चिडचिडेपणाची कारणं
- झोपेची कमतरता
- सततचा मोबाईल वापर
- पालकांचे दुर्लक्ष
- अन्नात पोषणमूल्यांची कमतरता
- शैक्षणिक दडपण आणि अपेक्षा
- खेळाचा अभाव
पालकांनी काय करावे?
- नियमित वेळ मर्यादा ठरवा:- मोबाईल वापरासाठी वेळ निश्चित करा. उदा. फक्त ३०-६० मिनिटे एकदाच, ठराविक वेळेला.
- वैकल्पिक पर्याय उपलब्ध करून द्या :- गोष्टी, चित्रकथा, रंगकाम, हस्तकला, बाहेर खेळणे – हे मोबाईलऐवजी दिल्यास मुलांचे लक्ष दुसरीकडे वळते.
- स्वतः मोबाईल कमी वापरा :- पालक जर सतत मोबाईलवर असतील, तर मुलंही त्याचे अनुकरण करतात. घरात संवाद वाढवावा.
- मुलांना समजून घ्या :- केवळ ओरडण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या भावनांना महत्त्व द्या.
- योग आणि ध्यानाचा उपयोग :- लहान वयात योग आणि साध्या ध्यान सरावामुळे चिडचिड कमी होते आणि मन शांत होते.
शिक्षण संस्थांची भूमिका
- शाळांनीही डिजिटल शिक्षणात संतुलन राखून मुलांना सर्जनशीलतेकडे वळवले पाहिजे. मैदानी खेळ, नाट्य, संगीत, चित्रकला यांसाठी वेळ व प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे.
निष्कर्ष
मोबाईल हा गरजेचा आहे, पण अतिरेकी वापर टाळणं हे आज काळाची गरज आहे. लहान मुलांची वाढ, मनोवृत्ती, आणि वैचारिक स्थैर्य टिकवण्यासाठी मोबाईलचा मर्यादित व योग्य वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. चिडचिडेपणा ही केवळ एक लक्षण आहे – त्यामागचं कारण समजून घेऊन योग्य मार्गदर्शन दिल्यास मुलं अधिक आनंदी, समजूतदार आणि सृजनशील बनतील.
"आपण हा लेख वाचल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! लेखाविषयी आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी मौल्यवान आहेत आणि त्या भविष्यातील लिखाण अधिक प्रभावी बनवण्यास मदत करतील."

0 $type={blogger}:
टिप्पणी पोस्ट करा